Skip to main content

कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तात्काळ बदली : 

कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तात्काळ बदली : 



पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे, कोरोनाच्या संकटकाळात झालेल्या या बदलीमुळे पनवेल राजकारणाला आता एक नवीनच वळण आले आहे, पालिका आयुक्त म्हणून गणेश देशमुख यांनी १८ इतर5 २०१८ ला लोकसेवा आयोगामार्फत त्यांची बदली पनवेल महानगरपालिकामध्ये झाली होती. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांची बदली झाली होती. पनवेल महानगरपालिकेच्या निर्मिती नंतर, पालिका आयुक्त गणेश देशमुख हे पालिकेचे ३ रे आयुक्त म्हणून त्यांना मान मिळाला होता .


महानगरपालिकाचा आयुक्त पदभार स्वीकारल्या नंतर नगरपालिकेचे पालिकेत रूपांतर झाले त्यानंतर पालिकेच्या विकासाचे मोठे आव्हान त्यांच्या समोर होते. त्यांनी हे काम अगदी चोख पध्दतीने बजावला आहे, पालिकेत सामावेश झालेल्या ग्रामीण भागतील विकासावर त्यांनी भर दिला होता, खेडेगावातील रस्ते आणि वीज पुरवठा पोहचवण्याचे काम त्यांनी केले, त्याचसोबत स्मार्ट व्हीलेज म्हणून गावचा विकास करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, घन कचरा व्यवस्था आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठीही त्यांनी प्रयत्न केला, आवास योजने तर्फे तळागाळातील लोकांना घरे उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयत्न करुन, जवळपास २२०० गरजूंना त्यांनी घरे देण्याचा प्रकल्पाला मजुरी घेऊन प्रत्येक्षात कामाला देखील सुरुवात झाली होती, मात्र कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामूळे त्यांचे हे काम अर्धवट राहिले गेले.


महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महानगरपालिकेत अतिरिक्त म्हणून त्यांची बदली झाल्याचे वृत्त समजले आहे आणि तसेच त्यांच्या जागी उल्हासनगरचे आयुक्त सुधारक देशमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याचे खात्री सूत्रांनकडुन सांगण्यात येत आहे. तर आता पनवेल पालिकेतुन एक देशमुख गेले तरी दुसरे देशमुख येण्याची जोरदार चर्चा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...