Skip to main content

कोरोना महासंकट : देशात लॉकडाउनमुळे एनएमएमटीचे उत्पन्न ठप्प ; ९ कोटींचा तोटा :

कोरोना महासंकट : देशात लॉकडाउनमुळे एनएमएमटीचे उत्पन्न ठप्प ; ९ कोटींचा तोटा : 


नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम अनेक वर्षांपासून तोट्यातच आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने आर्थिक समीकरणे जुळून येत नसल्याने उपक्रमाला तोटा सहन करावा लागत आहे.



नवी मुंबई : महापालिकेचा परिवहन उपक्रम अगोदरच तोट्यात असताना लॉकडाउनमुळे महिन्याला ९ कोटींची झळ सोसावी लागत आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एनएमएमटी बस धावत असल्याने व प्रवासी वाहतूक बंद असल्याने आता उत्पन्न पूर्णपणे थांबल्याने परिवहनला आता मोठा तोटा सहन करावा लागत आहे.


नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम अनेक वर्षांपासून तोट्यात आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने आर्थिक समीकरणे जुळून येत नसल्याने उपक्रमाला तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी, दरवर्षी महापालिकेच्या निधीवर या उपक्रमाला अवलंबून राहावे लागते.



शहरातील अवैध प्रवासी वाहतूक, रिक्षा व बेस्ट बस यामुळे अनेक मार्गांवर एनएमएमटीला अपेक्षित असा प्रवासी प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे महिना ६ कोटींपर्यंतचा आर्थिक फटका परिवहनला बसत आहे. तो सहन करून उपक्रम चालवला जात असतानाच २ महिन्यांपासून लॉकडाउनमुळे एनएमएमटीची प्रवासीवाहतूक ठप्प आहे. तर केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी ठरावीक मार्गावर बस चालवल्या जात आहेत.


एप्रिल महिन्यात केवळ १७ लाखांचे उत्पन्न परिवहनच्या पदरी पडले. लॉकडाउनपूर्वी परिवहनला महिना साधारण ९ ते १० कोटी उत्पन्न मिळत होते; परंतु २ महिन्यांपासून प्रवासीवाहतूक बंद असल्याने परिवहनच्या उत्पन्नाचे चाक लॉकडाउनच्या गाळात रुतले आहे. तर आणखी किती काळ बससेवा बंद राहील, याचेही चित्र अजुन स्पष्ट नाही.


परिवहनच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने प्रवासी संख्या कशी वाढेल यावर सतत भर दिला जातो. त्यानंतरही ठरावीक मार्ग वगळता इतर मार्गावर एनएमएमटीची प्रवासी संख्या वाढू शकलेली नाही. लॉकडाउनमुळे एनएमएमटीच्या तिजोरीला पडलेले भगदाड भरून काढण्यासाठी पुढील कित्येक महिने कसरत करावी लागणार आहे.



महिनाभरात १३ लाख उत्पन्न : 
परिवहनच्या कर्मचाऱ्यांचे वेतन सुरूच असून गतमहिन्यात त्यावर सहा कोटी ८८ लाख रुपये खर्च झाला आहे. तर इतर खर्च मिळून एकूण नऊ कोटी १६ लाख रुपये खर्चाचा भार परिवहनवर पडला आहे. उत्पन्न अवघे १७ लाखांचे झाल्याने आठ कोटी ९९ लाखांचा तोटा एप्रिल महिन्यात एनएमएमटीला सहन करावा लागला आहे.


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...