Skip to main content

करोना महासंकट : कोरोनच्या प्रादुर्भावामुळे १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल; खा. सुप्रिया सुळे. 

करोना महासंकट : कोरोनच्या प्रादुर्भावामुळे १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल; खा. सुप्रिया सुळे.


खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी साधला संवाद. यावेळी त्यांनी परीक्षा, लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसारख्या आशा विविध मुद्द्यांवर त्यांनी आपले मत व्यक्त केलं.



नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात आज लॉकडाऊन केले आहे. परंतु देशव्यापी लॉकडाऊनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. मात्र येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलं.


"लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बोनस वेळ मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरुच ठेवावा. येत्या १० मे पर्यंत परीक्षांबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे. ते यावर काम करत आहेत आणि लवकरच चित्र स्पष्ट होईल," असं खासदार सुळे यांनी सांगितलं.


महाराष्ट्र उद्धव ठाकरेंकडे मोठा भाऊ म्हणून पाहतोय
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणा हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. फेसबुकवर संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या की, "आज उद्धव ठाकरेंकडे राज्यातील जनता मोठा भाऊ म्हणून पाहतेय, याचा आनंद आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री चांगलं काम करत आहेत." तसंच महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.



लॉकडाऊन शिथिल करण्याचा सरकारचा विचार : 


लॉकडाऊन शिथिल होण्याची मीही तुमच्याप्रमाणेच वाट पाहत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवाय केंद्र सरकारही लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु लॉकडाऊन घाईगडबडीत उठवून चालणार नाही, ते टप्प्याटप्प्याने उठवलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनलॉकिंग हळूहळू सुरु झालं पाहिजे असं मत व्यक्त करताना लोकांना काम हवं असल्याचंही त्या म्हणाल्या.


पर्यावरणाबाबत संवेदनशील राहा : 


पर्यावरणाबाबत आपल्याला अधिक संवेदनशील राहावं लागेल. आपण आपल्या पातळीवर पर्यावरणासाठी योगदान द्यायला हवं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. टीबीमुळे राज्यात महिन्याला एक लाख लोक दगावतात. त्यामुळे खबरदारी घ्यायला हवी. यासाठी रस्त्यावर न थुंकण्याचे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच यासंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांच्याबरोबर एक कॅम्पेन करणार असल्याचं सांगत जनतेनेही अशी मोहीम सुरु करण्याचं आवाहन त्यांनी केलं.


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...