Skip to main content

कोरोना महासंकट : नवी मुंबईत उपचारादरम्यान झाला मृत्यू ; करोनानं घेतला पोलिस कर्मचाऱ्याचा बळी..!! 

कोरोना महासंकट : नवी मुंबईत उपचारादरम्यान झाला मृत्यू ; करोनानं घेतला पोलिस कर्मचाऱ्याचा बळी..!!


पोलिस दलातील कामोठे या विभागामध्ये राहणारे ५३ वर्षीय पोलीस कर्मचारी यांचा रविवारी करोना विषाणूमुळे मृत्यु झाला, तसेच मुंबई येथील वकोला पोलिस ठाण्यातील ५२ वर्षीय हेड कान्स्टेबलचा यांचा देखील शनिवारी करोनामुळे मृत्यू झाला.



नवी मुंबई : देश भरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याविरोधात समोर लढत असलेले डॉक्टर्स आणि पोलिसांना याचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. राज्य पोलीस दलातील २ कर्मचाऱ्यांचा यापूर्वी करोनामुळं मृत्यू झाला होता. त्यानंतर आता नवी मुंबईतील एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त देखील समोर आले आहे.


सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे या विभागामध्ये राहणारे ५३ वर्षीय पोलीस कर्मचारी दररोज मुंबई ते कामोठे असा एसटी प्रवास करुन आपले कर्तव्य बजावत होते. त्यांना प्रवासादरम्यान कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.


या पोलीस कर्मचाऱ्यावर यापूर्वी कर्करोगाचे उपचार सुरु होते. तरीही ते मागील अनेक दिवसांपासून आपले कर्तव्य बजावत होते. पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या घटनेबरोबरच रविवारी पालिका क्षेत्रात ३ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे इथला करोनाबाधितांचा आकडा ५२ वर पोहचला आहे. यामध्ये कामोठे, पनवेल आणि खारघर अशा तीन वेगवेगळ्या वसाहतींमध्ये राहणारे हे रुग्ण आहेत.



कामोठे येथील रुग्णांपैकी एक रुग्ण ५१ वर्षीय बेस्टचालक, दुसरा रुग्ण पनवेल शहरातील रहिवासी असलेली आणि मुंबईतील राजेवाडी रुग्णालयात स्टाफनर्स म्हणून काम करणारी ५० वर्षीय महिला तसेच तिसरा रुग्ण ४३ वर्षीय पुरुष असून तो खारघरमधील रहिवासी आहे तसेच सनदी लेखापाल म्हणून काम करतो. मुंबईत त्यांना कामादरम्यान करोनाची लागण झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले. मागील तीन दिवसांपासून पालिका क्षेत्रात राहणारे मात्र अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर असणारे पोलीस, पत्रकार, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर, चालक अशा रुग्णांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चाचणी दरम्यान स्पष्ट होत आहे.


करोनामुळे राज्य पोलीस दलातील पहिला बळी शुक्रवारी रात्री गेला होता. मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले ५७ वर्षीय हवालदार नायर रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू पावले होते. त्यानंतर शनिवारी करोनामुळं मुंबई पोलिस दलातील ५२ वर्षीय हेड कान्स्टेबलचा यांचा देखील मृत्यू झाला होता.


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...