Skip to main content

कोरोना महासंकट : हॉटस्पॉट भाग वगळता ४ मे रोजी लाॅकडाऊन उठवण्यावर एकमत, मात्र रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम :  

कोरोना महासंकट : हॉटस्पॉट भाग वगळता ४ मे रोजी लाॅकडाऊन उठवण्यावर एकमत, मात्र रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम : 


पंतप्रधानांचे राज्यांना आवाहन लॉकडाऊन उठवण्याबाबत धोरण तयार करा.



नवी मुंबई : देशातील कोरोनाबाधित हॉटस्पॉट असणाऱ्या भागात ३ मेनंतरही लॉकडाऊन सुरू राहील हे जवळपास निश्चित झाले आहे, तर ग्रीन झोनमधील लॉकडाऊन उठवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांत सोमवारी व्ही.सी. द्वारे झालेल्या बैठकीत अशी सहमती झाली आहे. बैठकीनंतर पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी म्हणाले की, बहुतेक मुख्यमंत्री ३ मेनंतरही लॉकडाऊन ठेवण्याच्या बाजूने आहेत. मात्र, त्यासोबतच हळूहळू आर्थिक कारभार सुरू करण्याचीही मागणी झाली आहे. राज्या-राज्यांत रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक ३ मेनंतरही बंद ठेवण्यावर सर्व मुख्यमंत्र्यांत एकमत दिसले. सूत्रांनुसार ग्रीन झोनमधील लॉकडाऊन सवलतींची घोषणा ३ मेनंतरच होईल. राज्यांनी स्थितीनुसार लॉकडाऊनच्या सवलतीबाबत धोरण ठरवावेेे. अर्थव्यवस्था सुस्थितीत असून घाबरण्याची गरज नसल्याचे या वेळी पंतप्रधानांनी सांगितले.




  • शाळा, माॅल बंद राहणार; ग्रीन झाेनमध्ये खासगी वाहने चालवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता

  • ग्रीन झोनमध्ये ३ मेनंतर टाळेबंदीत सूट दिली तरीही शाळा, महाविद्यालये, शाॅपिंग माॅल, धार्मिक स्थळे, सार्वजनिक वाहतूक बंद राहील. समारंभासाठी एकत्र येण्याचे निर्बंध कायम राहतील.

  • ग्रीन झोनमध्ये मर्यादित स्वरूपात खासगी वाहने चालवण्यास परवानगी मिळू शकते. पण रेल्वे, विमान प्रवास सुरळीत सुरू हाेण्याची काेणतीही शक्यता नाही. संसर्गाच्या आधारावर मेच्या मध्यापर्यंत काही ठिकाणांसाठी रेल्वे व विमान सेवांची मर्यादित वाहतूक सुरू हाेऊ शकते.

  • टाळेबंदीच्या एक्झिट प्लॅनवर शनिवारी अंतिम निर्णय हाेईल.

  • ओडिशासह ५ राज्ये ३ मेनंतरही टाळेबंदीत वाढ करण्याच्या बाजूने

  • ओडिशाने ३ जूनपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याची मागणी केली. पुद्दुचेरी, गाेवा, मेघालय, तेलंगण देखील टाळेबंदी वाढवण्याच्या मताचे आहेत.

  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांनी राज्यांना आपल्या येथील परिस्थितीनुसार टाळेबंदीतील धाेरण ठरवावे असे सांगितले आहे.

  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, जाेपर्यंत केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा हाेत नाही ताेपर्यंत काेटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणे शक्य नाही. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने खुली करावी, असे गुजरात सरकारचे मत आहे.

  • ममता म्हणाल्या- सर्व राज्यांना व्यक्त हाेण्याची संधी नाही
    प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सर्व राज्यांना व्यक्त हाेण्याची संधी मिळत नसल्याचा आराेप केला. मला संधी मिळाली असती तर राज्यात केंद्रीय पथक पाठवण्याचा मुद्दा मांडला असता, असे त्या म्हणाल्या.



हॉटस्पॉटचे निकष : जेथे रुग्ण १०० पेक्षा जास्त आहेत, रुग्ण दुपटीचा वेगही जास्त आहे, असे ३० जिल्हेच केंद्राने हॉटस्पॉट मानले आहेत, मात्र काही राज्यांत १०० पेक्षा कमी रुग्णाचे जिल्हे हॉटस्पॉट आहेत.


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...