Skip to main content

महासंकट कोरोना : शरद पवार म्हणाले काटकसर करा, वायफळ खर्च टाळा, आर्थिक संकट हे मोठं आहे.

महासंकट कोरोना : शरद पवार म्हणाले काटकसर करा, वायफळ खर्च टाळा, आर्थिक संकट हे मोठं आहे.



शरद पवारांनी फेसबुकवरून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देताना लोकांना जाणीव करून दिली आहे की राज्यावर आणि देशावर मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. त्यासाठी सरकार योग्य वेळी पावलं उचलेल, पण लोकांनी आतापासूनच काटकसरीने वागायला हवं, असा सल्ला त्यांनी दिला आहे.


शरद पवार यांच्या फेसबुक लाईव्हमधले त्यांनी सांगितलेले काही ११ महत्त्वाचे मुद्दे:


१} हे खूप मोठं संकट आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. सरकारी सूचनांचं तंतोतंत पालन करा.


२} आजचा तातडीचा प्रश्न आरोग्याचा. 2-3 आठवड्यांनंतर आर्थिक प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागेल. उद्योगधंदे बंद ठेवल्याने अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम


३} सगळ्यांना आर्थिक परिणाम भोगावे लागू शकतील. त्यासंबंधीचे निर्णय सरकार घेईल. लोकांनी काटकसर करावी. वायफळ खर्च थांबवावा.


४} संकटकाळात दवाखाने बंद ठेवणं ही गंभीर बाब. ज्यांना वैद्यकीय ज्ञान आहे, त्या सर्वांनी (BAMS, BHMS) मदत करावी.


५} ऊसतोड कामगारांची कारखान्यावरच सोय करण्यात यावी.


६} राज्याला पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा उपलब्ध आहे.


७} कुणी साठेबाजी करत असेल, तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागले. कठोर पावलं टाकली जातील. ही कमाईची संधी नाही. ही मदत करण्याची संधी आहे.


८} राज्य सरकार, अधिकारी हे सांगतील तेच ऐका. व्हॉट्सअपवर गोष्टी पसरवू नका.


९} खासगी फायनान्सवाले त्रास देत असतील तर शासनाला किंवा मला सांगा.


१०} शहरांतून गावांकडे जाणं टाळावं. गावकऱ्यांनाही भीती की शहरातून रोग येईल.


११} केळी उत्पादकांना थोडं नुकसान सहन करावं लागू शकतं. सरकार त्यांना शक्य होईल ती मदत करेल.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...