Skip to main content

राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा असणारे कोल्हापूर मधून एका तरूण उद्योजकांने होम कोरंटाईन रुग्णांसाठी दिले आपले थ्री स्टार हॉटेल:

राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा असणारे कोल्हापूर मधून एका तरूण उद्योजकांने होम कोरंटाईन रुग्णांसाठी दिले आपले थ्री स्टार हॉटेल: 



कोल्हापूर : जगभर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, प्रथम लक्षण असणाऱ्या रुग्णांना शासनाने होम कॉरंटाईन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना घरात कसं ठेवायचं ? असा प्रश्न लोकान समोर निर्माण झालेला आहे. पण यावर राजर्षी शाहू महाराज यांच्या नगरीतील अर्थात कोल्हापुरातील एक तरूण उद्योजक समोर आला आहे. त्यांनी होम कॉरंटाईनची सुविधा नसणाऱ्या रुग्णांसाठी स्वतःचं थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल त्या रुग्णांनसाठी खुलं केलं आहे.



कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरात हॉटेल कृष्णा इन आहे. प्रसिद्ध लेखक मृत्युंजयकार रणजित देसाई यांचे ते नातू सिद्धार्थ देसाई यांनी हे हॉटेल २०१३ साली कोल्हापुरात सुरू केलं. हॉटेलच्या व्यवसायात अत्यंत कुशल पद्धतीने सिद्धार्थ चालवतात. मात्र वडील,आजोबा यांच्यापासूनचं घरामध्ये समाजकार्य करण्याची परंपरा देसाई कुटुंबीयांमध्ये आहे. आता हा वारसा सिद्धार्थ देसाई पुढे चालवत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच या रुग्णांना होम कॉरंटाईन ठेवण्याचे आदेश शासनाने दिला आहे. अनेक रुग्णांना विविध कारणाने होम कॉरंटाईन करणं शक्य नसतं ही गरज ओळखून सिद्धार्थ देसाई यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने आपलं थ्री स्टार कॅटेगिरी मधील कृष्णा इन् हॉटेल बंद करून या हॉटेलमधील २८ रूम या कोरोनाबाधीत रुग्णांसाठी देण्याचे ठरविले. ही कल्पना त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर मांडली. त्यानंतर सर्व प्रशासकीय परवानगी घेऊन सिद्धार्थने आपलं हॉटेल होम कॉरंटाईनची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी खुलं केले आहे
पण कोरोनाबाधित रुग्ण या हॉटेलमध्ये येणार असल्याचे कळतात हॉटेलमध्ये काम करणारे अनेक जण नोकरी सोडण्याच्या तयारीला लागले. मात्र सिद्धार्थनी त्यांची समजूत काढली आणि आपल्या हॉटेलमध्ये २८ खोल्या या रुग्णांसाठी दिल्या. ज्यांना घरातून डबा येणं शक्य आहे नाही, त्यांना घरातून जेवणाचे डबे येतात. मात्र ज्यांना जेवणाचे डबे येत नाहीत त्यांच्यासाठी चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय सिद्धार्थ यांनी केली आहे. संपूर्ण जगावर संकटकाळ परिस्थिती ओढवलेली आहे. अशा परिस्थितीत प्रशासन सर्वच गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे त्यांना जागरूक नागरिकांनी मदत केलीच पाहिजे.


सध्याची परिस्थिती पाहता आपणही काहीतरी करावं असं या तरुण उद्योजकाला वाटलं आणि त्यांनी स्वतःचं थ्री स्टार हॉटेल या रुग्णांच्या सेवेसाठी दिलं. सिद्धार्थ यांनी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतलेलं आहे. नोकरीमध्ये मन रमलं नाही म्हणून त्यांनी हॉटेल व्यवसाया बरोबरच समाजप्रबोधनाचे काम कोल्हापुरात २००६ पासून सुरू केले आहे. घरामध्ये समाज प्रबोधनाचा वारसा असल्यामुळे सिद्धार्थना कोरोनाबाधित रुग्णांसाठी काम करण्याचे बळ मिळाले आहे. आपलं हे काम खूप छोटं असून आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण समाजसेवा करत असून यामध्येच आपणाला समाधान असल्याचं सिद्धार्थ सांगतात. सिद्धार्थ देसाई या तरूणाने घेतलेला निर्णय हा निश्चितचं कौतुकास्पद आहे. समाजातील इतर घटकांनीही सिद्धार्थ यांच्या निर्णयाचं अनुकरण करून अशा आपत्कालीन परिस्थितीत आपले हात खुले करून काम केलं तर कोरोना सारख्या या महारोगला कसल्या परिस्थितीत आपण निश्चितच सगळे मात करू यात शंका नाही.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...