Skip to main content

एपी.एम.सी. भाजीमार्केट खारघरमध्ये स्थलांतर ; प्रशासनांनी घेतला मोठा निर्णय सिडकोने त्वरीत उपलब्ध करुन दिला भूखंड:

एपी.एम.सी. भाजीमार्केट खारघरमध्ये स्थलांतर ; प्रशासनांनी घेतला मोठा निर्णय सिडकोने त्वरीत उपलब्ध करुन दिला भूखंड:



वाशीतील एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला आणि फळ मार्केट खारघरला हलवण्यात येणार आहे. खारघरच्या सेंट्रल पार्कजवळ असलेल्या मोकळ्या मैदानावर हे मार्केट तात्पुरत्या स्वरुपात हलवण्यात येणार आहे. सिडकोने ५० एकर भूखंड उपलब्ध करून दिला आहे, तसेच १ हजार चौरस फुटांचे जवळ जवळ १२०० ते १३०० गाळे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.


एपीएमसी मार्केट प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वारंवार सांगून देखील एपीएमसी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने भाजीपाला आणि फळ मार्केट हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, बाजार समिती सचिव अनिल चव्हाण आणि एपीएमसीच्या इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये आता किरकोळ खरेदीदारांना आत सोडण्यावर बंदी घातलण्यात आली आहे. फक्त होलसेलर यांनाच आत सोडण्यात येणार आहे. तसेच, मार्केटमधील गर्दी कमी झाली नाही तर संपूर्ण मार्केटच खारघर येथे हलवण्यात येईल, असा निर्णय मार्केट प्रशासनाने घेतला आहे. 



तसंच, एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला आवारात फक्त ३०० गाड्यांना सोडण्यात येणार आहे. जर नियमांचे पालन केले नाही तर परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये असलेले सर्व घाऊक व्यापारी आणि इतर घटकांनी जर हे नियम तोडले तर भाजीपाला आणि फळ मार्केटच्या जवळपास २००० व्यापाऱ्यांना खारघर येथील सेंट्रल पार्कच्या जवळ असलेल्या मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात मार्केट उभं करण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...