Skip to main content

'उद्धव ठाकरे म्हणाले", या काळाची नोंद इतिहासात होईल':

'उद्धव ठाकरे म्हणाले", या काळाची नोंद इतिहासात होईल'



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाइव्हद्वारे महाराष्ट्राशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपल्या घरीच थांबा असं आवाहन सगळ्या जनतेला केली. तसेच जे पायी जाउन राज्य सोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना राज्य न सोडण्याचीही विनंती करण्यात आली आहे. हे आश्वासन दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही वेळातच महाराष्ट्रात २६२ केंद्रं उभी राहिल्याची माहिती ही दिली आहे.


देशात चाचणी केंद्रं ही वाढवली आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढेल. ही वाढ लक्षात येतीये, पण त्याचबरोबर या विषाणूनं ग्रासलेले लोक बरेही होत आहेत, ही आशादायक गोष्ट आहे. आता न्यूमोनियाची लक्षणं वाढतील. सर्दी-खोकला किंवा न्यूमोनियाचे पेशंट आले, तर त्यांना तातडीने एक्सरे आणि हिमोग्राम करायला सांगा.


आपल्याकडे काही हजार प्रवासी आले आहेत. त्यांना आपण होम क्वारंटाईनमध्ये राहायला सांगितलं. पण ते क्वारंटाईनमध्ये राहत आहेत, की नाही हे पाहणं कुटुंबीयांची तसंच नातेवाईक, शेजाऱ्यापाजाऱ्यांची जबाबदारी आहे. हाय रिस्क ग्रुप म्हणजेच गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध, मधुमेह रुग्ण, तसंच रक्तदाब असलेल्या व्यक्ती यांना अधिक जपणं गरजेचं आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात गर्दी कमी नाही झाली, तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील.
लॉक डाऊन झाल्यानंतर पाच दिवस झाले आहेत. पुढचे दिवसही असेच निघून जातील. आपल्याला आपली जीवनशैली थोडी बदलावी लागतीये इतकंच.


या काळाची नोंद जगाच्या इतिहासात होईल, कारण असा काळ जगानं पाहिला नाही.
कामगारांच्या राहण्याची, तसेच मोफत खाण्याची सोय करतोय'
उद्धव ठाकरे म्हणाले...


संपूर्ण देशात इतर राज्यातील कामगार आपापल्या राज्यात जायला उत्सुक झाले आहेत. महाराष्ट्रात असलेल्या इतर राज्यातील कामगारांनी आहे तिथंच थांबावं, अशी विनंती. कृपया गोंधळ करू नका. महाराष्ट्र सरकार तुमची काळजी घेत आहे. तसेच ठाकरे सरकारने ७० हजार पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या सगळ्यांसाठी २६२ निवारा केंद्रं उभारण्यात आली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. महाराष्ट्रात २६२ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये स्थलांतरिक कामगार, बेघर लोक राहू शकतात
कामगारांच्या जेवण्याची तसंच राहण्याची व्यवस्था सरकार करत आहे. त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रयत्न करू नका. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यातही कामगारांची वाहतूक होता कामा नये.


काही ठिकाणी लोक आवश्यक नसताना बाहेर पडत आहेत. मी विनंती करतो, की वर्दळ करू नका. विनाकारण सरकारला कठोर पावलं टाकायला लावू नका. ही आरोग्यविषयक आणीबाणी आहे. त्यामुळे प्रत्येकानं जबाबदारीनं वागायला हवं.


शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळेल. सरकार तुम्हाला मदत करत आहे. तुम्हीही सरकारला पूर्ण सहकार्य करावं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्याला संदेश: 
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याला उद्देशून भाषण करत आहेत. ओढवलेल्या आरोग्य संकटात सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांसह सर्वांचे आभार मानले.


मुख्यमंत्री यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे -
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील सर्व नेते माझ्यासोबत
आहेत. विरोधी पक्षनेत्यांशीही मी चर्चा करत आहे. राज ठाकरे यांच्या सोबतही माझं बोलणं सुरू आहे. सर्वच क्षेत्रातून लोक पुढे येत आहेत मदतीसाठी. मुख्यमंत्री निधीसाठी उदय कोटक यांनी 10 कोटी रुपयांची मदत केली. त्या सर्वांचे मी आभार मानतो. केंद्राशीही आमचा संपर्क आहे. पंतप्रधान, अमित शाह यांच्याशी मी संवाद साधत आहे. केंद्राच्या योजनाही तुमच्यापर्यंत पोहोचतील. डॉक्टरांशी बोलणे चालु आहेत.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...