Skip to main content

“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली प्रेमापोटीची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतले:

“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली प्रेमापोटीची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतले: 



आज भारतात या महाआजाराच्या संकटामुळे जगभरातील कामगार वर्ग व मजूरांचा आपल्या मायदेशी जाण्याचे चित्र अनेक ठिकाणी आपल्याला दिसत आहे, हे समजल्या नंतर वर्धा येथील ‘सचिन’ने पूढाकार घेत त्या गरीब हातावर पोट असल्या कामगारांना विनंती केल्यावर दीडशेवर परप्रांतीय गावातच थांबण्यास तयार झाले. जय महाकाली संस्थेचे सचिन अग्निहोत्री व वैद्यकीय मंचचे डॉ. सचिन पावडे या दोघांनी केलेली विनवणी प्रशासनास दिलासा देणारी ठरली.


राजस्थान, मध्यप्रदेश व तेलंगणा येथील कामगार व मजूर वर्ग वर्ध्यात कार्यरत आहेत. मात्र रोजगार ठप्प पडल्याने ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. प्रशासनाची विनंती त्यांनी धुडकावली. हे दीडशेवर कुटुंब रस्त्याने निघाले असतांनाच अग्निहोत्री व पावडे यांना या विषया बद्दलची माहिती मिळताच त्या लोकांनकडे धाव घेतली त्यांना समजवण्यात आले रस्त्याने जाणे धोकादायक आहे आणि हे सांगितले की तुमच्या राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. वाटेत खाण्यापिण्याचे वांदे होतील. हे संकट झेलण्यापेक्षा तुम्ही कामाशिवाय राहाल तितके दिवस आम्ही तुमला सांभाळून घेऊ, अशी विनंती या दोघांनी केली. आम्हाला आपला मुलगाच समजा, अशी साद त्यांनी महिलांना घातली मग या कुटूंबांनी परत आपल्या झोपडीकडे वळण्याचा निर्णय घेतला.


आर्वी नाका परिसरातील तेलंगणातील मजुरांना डॉ. पावडे यांनी ५ किलो तांदूळ व अन्य साहित्य देऊन अन्नपाण्याची व्यवस्था केली. नंतर सचिन अग्निहोत्री यांनी राजस्थानी व मध्य प्रदेशातील मजुरांकडे मोर्चा वळवला. प्रत्येक कुटूंबाला एका पोत्यात ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, तसेच कणीक, साखर, तेल, डाळ, जिरा पावडर, चणा, वटाणा, पोहे अशा विविध २१ वस्तूंचा ८२० रूपये किमतीचा शिधा दिला. ही मदत पाहून गहिवरलेल्या राजस्थानी महिला चक्क पाया पडायला लागल्या तेव्हा त्यांना धीर देण्यात आला.


स्वयंपाकाची चूल व भांडीकुंडी मजूरांकडे होतीच. यापुढील टप्यात वर्धेतील झोपडपट्टी वसाहतीत १०० कुटूंबांना उद्यापासून धान्य देण्याचे काम वैद्यकीय मंचातर्फे होणार असल्याचे डॉ. पावडे यांनी सांगितले, तर गावातील भिकाऱ्यांना एका ठिकाणी जमा करून त्यांच्या थेट भोजणाची व्यवस्था करण्याचे ठरले असल्याचे अग्निहोत्री यांनी सांगितले, या प्रकरणी प्रशासनाने आमची मदत मागितलेली नव्हती. आम्हीच हे काम करण्यासाठी प्रशासनाला केवळ लेखी संमतीपत्र मागितल्याचे या दोघांनी सांगितले. आम्हाला याचा गवगवा नकोच, असेही ते प्रांजळपणे म्हणाले. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी या कार्यामूळे प्रशासनावरील ताण कमी झाल्याचे मान्य केले. स्वयंस्फूर्तीने मदत करणाऱ्यांची खरच आज यावेळी गरजच आहे असे त्यांनी नमूद केले.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...